वसंतराव नाईक यांच्या नातवाला मंत्रिमंडळात समावेश न केल्याने बंजारा समाज नाराज..!
मुंबई दि.९(प्रतिनिधी)- मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने वसंतराव नाईक यांचे नातू इंद्रनील नाईक यांना डावल्याने बंजारा समाज नाराज झाला आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात काँगेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन एका ही बंजारा समाजाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही ..
याबाबत बंजारा नेते आकाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील जडण-घडण यातील वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांनी प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचे नेतृत्व करत विकासाची दिशा दिली त्याचबरोबर मागील 20 वर्षांपासून माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी वैचारिक वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोलाचे योगदान दिले बंजारा समाजातील नाईक कुटुंबीयांचे हे सुवर्ण इतिहास असून सुद्धा हा या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले एकमेव तरुण तडफदार बंजारा प्रतिनिधित्त्व इंद्रनिल नाईक यांना शरद पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान देऊन महाराष्ट्रातील जवळजवळ पंचेचाळीस मतदारसंघात राजकीय दृष्ट्या निर्णय असलेल्या बंजारा समाजाला इंद्रणील नाईक यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देऊन न्याय देतील अशी अपेक्षा बंजारा समाजाला होती, परंतु काही राष्ट्रवादीच्या हुकूमशाही नेत्याच्या बंजारा द्वेष मुळे शरद पवार यांनी सुप्त इच्छा असतानाही त्यांना डावलने अन्यायकारक असून यांना यामुळे बंजारा समाजात नाराजी पसरली आहे असे संतप्त प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे येणाऱ्या काळात बंजारा समाजाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे नेते आकाश जाधव यांनी येथे बोलताना व्यक्त केली.
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
■★■★★■★◆★◆★◆★
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......
बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी
*संपादक संतोष सागवेकर*
*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*
*वर संपर्क साधावा*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*Youtube _ Facebook* _
*Instagram Twitter*
*वर ही*
*आता पुणे प्रवाह*
..................
*वरील सर्व पेज लाईक* -
*सबस्काईब करून*,
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....*
★★★★
*सदैव राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏