पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नेरळ मध्ये दोन नवीन रुग्ण...
पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल चुकीचा असल्याचे जाहीर
कर्जत,ता.23 गणेश पवार
कर्जत तालुक्यात 22 जून रोजी एकदच मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले होते.आज मात्र त्यात दिलासा मिळाला असून आज केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान,नेरळ ग्रामस्थांनी काळजी घेण्यासाठी पुढील काळात शासनाच्या आदेशाने नियम पाळून व्यवहार करण्याचे ठरले आहे.
कर्जत तालुक्यात आज नेरळ येथील महावितरण कंपनीचा एक कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ममदापुर येथील 22 जून रोजी मृत पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा 44 वर्षीय मुलगा यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यात ममदापुर गावात आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण ममदापुर येथील मृत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिला यांचा मृतदेह दफन करण्यासाठी ममदापुर येथे आणला होता.त्यामुळे त्या महिलेच्या दफनविधी मध्ये सहभागी झालेले नातेवाईक आणि ग्रामस्थ मंडळी यांना संसर्ग झाला तर काय करायचे ?याबद्दल प्रशासन देखील साशंक आहे. त्याचवेळी नेरळ पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक यांचा अहवाल 21जून रोजी पॉझिटिव्ह आला होता,परंतु त्यांच्या अहवालाबद्दल 22जून रोजी जेजे रुग्णालय कडून पुन्हा अहवाल पाठवण्यात आला आहे.त्यानुसार 35 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे आपले काम देखील सुरू केले आहे.त्यात नेरळ पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि 8 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले असल्याने पोलीस उपनिरीक्षक यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांचा फायदा नेरळ पोलीस ठाणे यांना होणार आहे.
नेरळ मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांची वाढती संख्या लक्षात घेता नेरळ मधील व्यापारी आणि नेरळ ग्रामपंचायत यांची नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आज बैठक झाली. त्या बैठकीत कोरोना च्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.त्यात नेरळ ग्रामपंचायत कडून सर्वांना दुकानात आलेले गिऱ्हाईक हे मास्क वापरत नसतील तर त्यांना कोणत्याही प्रकारची वस्तू यांची विक्री करू नये.त्याचवेळी व्यापारी देखील मास्क आणि हँडग्लोज वापरत नाहीत.त्यामुळे सर्वांनी आपले आणि गावचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यापारी जो निर्णय घेतील त्याला नेरळ ग्रामपंचायत चा पाठिंबा आहे असे जाहीर केले.बैठकीला ग्रामपंचायत उपसरपंच शंकर घोडविंदे,सदस्य प्रथमेश मोरे,नेरळ व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष कलमेश ठक्कर,माजी अध्यक्ष सावळाराम जाधव, कामगार नेते विजय मिरकुटे, यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी हजर होते.तर या बैठकीत अरविंद कटारिया,नितेश शाह,सलीम तांबोळी,आसिफ अत्तार,बंडू क्षीरसागर,गोरख शेप,विशाल साळुंखे,संदीप म्हसकर,पंढरी हजारे,राजेश वलेचा, यांनी आपली बाजू मांडली.