पुणे प्रवाह न्युज पोर्टल
🚩
सध्या काही जातीवादी लोक जाणिवपुर्वक सोशल मेडीयावर विषारी आक्षेपार्ह *#पोस्ट आणि #व्हिडिओ* टाकून दोन्ही बाजूने सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण प्रयत्न करत आहेत, अशा बाजार भुनग्याना कठोर शासन झालेच पाहिजे. *कुठल्याही 'स्त्री' ची अथवा 'समाजा'ची अर्वाच्च भाषेत बदनामी करू नका.* ही वाईट प्रवृत्ती आहे. जाणिवपुर्वक समाजात जातीय तेढ निर्माण करून वाद निर्माण करण्याचा कट दिसून येत आहे. लक्षात ठेवा... आपण *जातीच्या विरोधात आहोत की जातीयवादाच्या...?*
#कायदा सर्वोच्च आहे. गुन्हेगार व नराधम जो कोणी असेल त्याला कठोर शासन होईल. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र यामध्ये निरापराध व्यक्तीचा कट रचून बळी सुद्धा गेला नाही पाहिजे, हे ही महत्वाचं आहे.
काळजी घ्या. सामाजिक तेढ निर्माण होईल असं काही लिहू अथवा पसरवू नका. आपल्याला महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष लोकशाही समाज निर्मिती करायची आहे. आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे.
*छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र...*
*तुमच्या स्वार्थासाठी बदनाम करू नका.*
जय जिजाऊ... जय शिवराय...!!
- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.